सिन्नरचे शिल्पवैभव : गोंदेश्वर , ऐश्वर्येश्वर

अरे हा कुठला फोटो आहे?  काय भारी लोकेशन आहे,  स्वर्गमंडप म्हणतात तो हाच का रे? खिद्रापूर आहे का हे? इतके मोठे देऊळ साऊथ मधले आहे का काय?  शंतनू आणि अनुराग यांच्या फोटोंवर अशी प्रश्नांची सरबत्ती झाली होती सुमारे वर्षभरापूर्वी. बरोबर तोच प्रसंग आज माझ्याबरोबर घडत होता. उत्साहाने स्टेटस वर फोटो अपलोड  केले होते आणि  फोटो अपलोड केल्यापासून साधारण १  तासात सुमारे १०० लोकांना या मंदिरांचे नाव आणि जागा सांगत  रिप्लाय करत होते.

.पुण्याहून सुमारे 190 Km वर सिन्नर मधील  गोंदेश्वर मंदिर भेटीची ही किमया. पूर्वापार तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक /नासिक आणि त्याच्या जवळच असलेला हा सिन्नरचा संपन्न परिसर

फिरस्ती महाराष्ट्राची या ग्रुप बरोबर आधीच्या अनेक ट्रिप्स चा अनुभव गाठीशी असल्यामुळे या ट्रिपचा चान्स तर मी सोडणारच नव्हते.  आधीची ट्रीपची तारीख माझ्या सोयीची नव्हती पण नशिबाने त्यांची ट्रिप पुढे ढकलली गेली आणि या मंदिराला  भेट देण्याचा योग जुळून आला.

भल्या पहाटे ५ ला आम्ही निघालो होतो तरी कोणीही डुलक्या काढण्याच्या मूड मध्ये नव्हते त्यामुळे सुरवातीपासूनच गप्पांचा फड  जमायला लागला. अगदी चेडोबा मंदिर, रिचर्ड बर्टनचे पुस्तक तसेच  भौगोलिक वर्णने ज्यात नाशिकचे वर्णन प्रामुख्याने येते अशा ‘विविध तीर्थ कल्प’ या ग्रंथाची चर्चा रंगू लागली. मध्ये थोडी विश्रांती घेऊन, श्री गुरु या हॉटेलमध्ये चविष्ट नाश्ता करून आमची गाडी परत सिन्नरच्या दिशेने धावू लागली.  

आमचा प्रवासाचा पहिला टप्पा होता ऐश्वर्येश्वर! तिथे पोचल्यावर पटापट सगळ्यांचे कॅमेरे आणि मोबाईल्स बाहेर निघाले. विविध अँगल्स टिपण्यात सगळे मश्गुल झाले. मंदिराच्या मागच्या बाजूची शिल्पे गर्दी नसताना टिपावीत या हेतूने मी आधी तिकडे धाव घेतली पण ती व्यर्थ  ठरली कारण तिथे Pre – Wed  शूट साठी टीम जमली होती त्यामुळे नवरा , नवरी आणि कॅमेरामन यांना त्रास न देता अस्मादिक परत मंदिराच्या पुढील भागात परत आले. 

ऐश्वर्येश्वर हे मंदिर ऐरम राजाने बांधलेले आहे. सरस्वती नदीच्या काठी बांधलेले हे मंदिर साधारण १० व्या शतकात बांधल्याचे उल्लेख मिळतात. यादव काळातील पहिली राजधानी हा मान सिन्नर ला मिळतो.

सभामंडप, अंतराळ आणि गर्भ गृह पाहता येते. या मंदिराची रचना द्राविड शैलीत आहे. या मंदिरातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मकर तोरण. सामान्यतः अंतराळाच्या प्रवेशाचे वरच्या बाजूस हे मकर तोरण आढळते.

या तोरणात व्याल, कीर्तिमुख,यक्ष, अप्सरा आणि मयूर असे थर दिसून येतात. दोन मगरीच्या तोंडांतून निघालेली ही वैशिष्टयपूर्ण शिल्पे आणि मधोमध नृत्यरत शिव. आत वितानावर अष्ट दिक्पाल कोरलेले आढळतात.  या देवळात सप्तमातृकापट, भैरव,गणपती यांच्या  बरोबर ललाट बिंबावर गजलक्ष्मी दिसून येते.

चक्रधर स्वामी यांच्या स्थानपोथी मध्ये ऐश्वर्येश्वर या देवळाचे उल्लेख येतात ही माहिती पण ग्रुप लीडर अनुरागने पुरविली.

देवळात एक माणूस शांत चित्ताने शिवपिंडीला अभिषेक घालत होता. बाहेरचा कोलाहल, गटागटाने येणारी, मोबाईल,  कॅमेरे हातात घेऊन आसपास भिरभिरणारी माणसे, मंदिर परिसरातच  चाललेले Pre – Wed  शूट याचा काहीही परिणाम न होता शांत एकाग्र चित्ताने तो तन्मय झाला होता.

त्यानंतर आमचा मोर्चा वळला ते मुख्य मंदिराकडे म्हणजे गोंदेश्वरकडे. अवघ्या १० मिनिटात आम्ही तिथे पोचलो. दगडी तटबंदीयुक्त देवळात  मुख्य दरवाजातून प्रवेश केला. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील संरक्षित  स्मारक म्हणून घोषित केले आहे.  आत प्रवेश करतानाच भव्य परिसरात वसलेले पंचायतन (मध्यभागी मुख्य मंदिर व चार बाजूला उपमंदिरे) दिसून आले. गोंदेश्वर हे शैव पंचायतन आहे. मध्यभागी शिव आणि बाकीच्या चार कोपऱ्यात गणपती, सूर्य, देवी व विष्णू यांची मंदिरे आहेत. A.S.I. ने ह्या मंदिराची वेळोवेळी डागडुजी करून मंदिराचे सौंदर्य अबाधित राखले आहे.

पूर्व आणि दक्षिण दिशांना दरवाजे असून सध्याच्या वापरासाठी दक्षिण दरवाजा खुला आहे. आत शिरताच डाव्या हाताला एक खोलीवजा जागा आहे. पूर्वीच्याकाळी भांडार गृह, स्वयंपाकाची खोली असा त्याचा वापर होत असावा.

आत शिरताच मी, शिवराज आणि सविता मॅडम ने एका अमेझिंग फोटो स्पॉट च्या दिशेने धाव घेतली तो स्पॉट म्हणजे गोंदेश्वर च्या मंदिरातील, मुख्य मंदिरासमोर असलेली  धर्मशाळा किंवा मठ. यातील वरचा भाग पडून गोलाकार भाग उघडा  झाला आहे त्यामुळे  तिथे खिद्रापूरच्या स्वर्गमंडपासारखी जागा  निर्माण झाली आहे. बाकी टीम इकडे तिकडे फिरण्यात व्यस्त आहे हे बघून आम्ही निवांतपणे  एकमेकांचे मस्त फोटो काढले.  बाकीच्या टीम ला हा स्पॉट न सांगण्याचा एक कुचका प्लॅन पण आमच्यात शिजला पण टीम मध्ये आधीच रथी महारथी होते आणि बाकीचे स्मार्ट लोकं इन्टरनेट वरून सगळी माहिती घेऊन आले होते त्यामुळे लवकरच तिथे गर्दी जमली व आम्हालाच काढता पाय घ्यावा लागला.  

गोंदेश्वर मंदिराच्या एका देवळाच्या सावलीत आम्ही कोंडाळे करून बसलो. ग्रुप लीडर शंतनूने मंदिर कल्पना कशी अस्तित्वात आली हे सुंदररित्या समजावले.  मला देगलूरकर सरांच्या ‘मंदिर कसे पाहावे’ या पुस्तकाची आठवण आली. त्यात परिपूर्ण मंदिर वास्तू म्हणजे काय? मूर्तीसंबंधीच्या कल्पना, मंदिरे, त्यावरील शिल्पकृती यांच्या निर्मितीमागील उद्दिष्टे, तसेच त्यातील कलात्मकता आणि तात्विकता अतिशय उत्तम पद्धतीने उलगडून दाखवली आहे.    

गोविंद नावाच्या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधल्याचा संदर्भ शंतनूने दिला. देवळाला साधारण पुरुषभर उंचीचे अधिष्ठान आहे, त्यावर मंडोवर, शिखर व कलश अशी रचना आहे. शंतनू ने जवळच गोंदे गाव असल्याचाही उल्लेख केला. या देवळाचे भूमिज शिखर साप्तभौम पद्धतीचे आहे. पूर्ण मंदिर भूमिज वेसर पद्धतीत बांधलेले आहे. मंदिराच्या पूर्वदिशेला नंदीमंडप आहे, तोही अनेक पौराणिक शिल्पे, फुले पाने वेलबुट्टी याने सुशोभित आहे. सभामंडपात रंगशिळा आहे त्यापुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मकरमुख. मकर हे गंगेचे वाहन असल्यामुळे इथे अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची रचना आहे. 

मंदिराला सर्वात खाली गज थर आहेत पण त्याच्या सोंडा कापून टाकलेल्या आहेत.

या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते की चोराला या हत्तीपैकी एका हत्तीच्या सोंडेत हिरा सापडला आणि त्यांनी लालसेपोटी बाकीच्या हत्तीच्या सोंडा कापून टाकल्या. या  गजथरावर  यादव कालीन देवळांचे वैशिष्ट्य असलेली पानाफुलांची नेहमीची वेलबुट्टी आढळते.

आमच्या ट्रिप मध्ये नाशिकहुन महेश शिरसाठ हे इतिहास अभ्यासक एक छोटा ग्रुप घेऊन आम्हाला जॉईन झाले. त्यांची इतिहासाची, मूर्तिशास्त्राची आवड आणि अंगी असलेली नम्रता प्रकर्षाने जाणवली. त्यांनीही अनेक शिल्पे आम्हाला उलगडून दाखवली.

मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या अनेक अप्रतिम नर्तकी, सुरसुंदऱ्या, दर्पण सुंदरी, हातात कलश घेतलेली जया,डालंबिका,आलसा तसेच  रामायणाचे शिल्पपट,  देवी देवता यांच्या मूर्ती, मैथुन शिल्प, आजूबाजूच्या समाजव्यवस्थेचे चित्रण करणारी शिल्पे, वामन अवतार, वराह अवतार तसेच अनेक पौराणिक प्रसंग दिसून येतात. या कमनीय बांध्याच्या सुरसुंदरी नर्तिका पाहताना मनात कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितेच्या काही ओळी मनात रुंजी घालत होत्या

‘केशी तुझिया फुले उगवतील तुला कशाला वेणी?

चांदण्यास शृंगार  कशाला बसशील तेथे लेणी ‘

मंदिरातील आतील खांबसुद्धा अनेक शिल्पांनी सुशोभित आहेत.  कुठे नरसिंह अवतार तर कुठे वामन अवतार, कुठे मैथुन शिल्पे तर कुठे आई, बाळाला झोळीत झोका देता देता ताक घुसळत घरगुती कामे करतीय अशी शिल्पे. सर्व भिंती, छत, प्रत्येक स्तंभ कोरीवकामाने नखशिखांत लगडलेले दिसतात. मंदिराची द्वारशाखा, स्तंभ शाखा, वेलबुट्टी शाखा अशा विविध शाखांनी नटलेली आहे.

Dwarshakha

 या मंदिराच्या रचनेत चुना किंवा मातीचा वापर न करता एकावर एक दगड रचून इंटरलॉकिंग पद्धतीने याची रचना केलेली आहे. इथे सूर्यमंदिर असल्याने रथसप्तमी ला इथे उत्सव असतो तसेच अनेक जण त्या उत्सवात सूर्यनमस्कार घालतात.

चहा नाश्त्याचे सेंटर चालवणारे भरत शिंदे आमच्यासाठी अतिशय उत्तम जेवण घेऊन आले होते, मटकी उसळ, पिठले, पोळ्या, बटाटा भाजी, भात, डाळ,  पापड  आणि जोडीला झणझणीत मिरचीचा ठेचा असा मस्त बेत रंगला. मंदिर परिसरात सावलीत आमचे अतिशय उत्तम भोजन झाले. भरत शिंदे हे रोजच्या नफ्यातील पहिली जी काय मिळकत असेल ती समाजोपयोगी कामासाठी देतात हे ऐकून खूपच आनंद वाटला.

आमच्या गटातील मंजुघोषा पवार या पंढरपूरच्या. तिथे त्या एक उपहारगृह चालवतात. आषाढ शुद्ध द्वादशीला सर्व भक्त गणांसाठी, वारकऱ्यांसाठी आणि पांथस्थांसाठी त्या पहाटे पासून ते रात्रीपर्यंत पुलावाचे / खिचडीचे  वाटप पूर्णपणे मोफत, विठूरायाची एक सेवा या भावनेतून करतात.

एक छोटीशी ट्रिप सुद्धा किती नवनवीन अनुभवांची, विचारांची शिदोरी देऊन जाते ना? 

खरे सांगायचे तर अशा शिल्पांच्या दुनियेत प्रवेश केल्यावर माझी अवस्था थोडीशी भांबावल्यासारखीच होते. काय काय पाहू, समजून घेऊ, कॅमेऱ्यात बंदिस्त करू ….. दुबळी माझी झोळी अशी काहीशी अवस्था. त्यामुळे एकाभेटीत संपणारा हा विषय नक्कीच नाही. परत परत या ठिकाणी येऊन अजून काही शिल्पकलेचे बारकावे बघायचे आहेत.

परतीचा प्रवास काहीसा कंटाळवाणा झाला. बरीचशी मंडळी आता दिवसभरामुळे दमून गेली होती पण मी मात्र टक्क जागी आणि इतर काही अजून वाटेत बघता येईल का ही चाचपणी करत  होते. डुबेर इथला बर्वे वाडा (बाजीराव पेशवे यांचे जन्म स्थळ), मुक्तेश्वर, टाहाकारीचे भवानी मातेचे मंदिर , गारगोटी म्युझियम अशी बरीच मोठी लिस्ट पुढच्या ट्रिप साठी मनात तयार होत होती. 

चाकण जवळ आल्यावर मंडळी हळू हळू जागी होऊ लागली, स्वप्नाली, स्वानंदच्या कोकणच्या गप्पा सुरु झाल्या. स्वप्नालीच्या काकूंना वाटेत एका ठिकाणाहून चहा ची पावडर घ्यायची होती. आम्हा सगळ्यांना आता चहाला घरी बोलावलेच पाहिजे असे आम्ही चिडवले, त्यांनीही ते अगदी मजेत घेत होकारही दिला.असा आमचा परतीचा उरलेला प्रवास छान खेळीमेळीत पार पडला.

गोंदेश्वरचे शैव पंचायतन म्हणजे स्थापत्यकलेचा आणि शिल्पकलेचा एक अत्युत्तम नमुना. फिरस्ती बरोबरची ऐश्वर्येश्वर आणि गोंदेश्वर ही ट्रिप नेहमीप्रमाणेच खूप आनंद देऊन गेली, अजून नवीन गोष्टी शिकण्याचा, पाहण्याचा, वाचण्याचा उत्साह देऊन गेली.

Shree Laxmi Nrusinh Temple, Pune

We are always in a hurry to reach some destination. As our entire goal is to reach that destination at the earliest, we always (well most of the time) miss the important milestones which are on the way. I have passed by this particular road in Sadashiv Peth at least 1000 times during the past so many years but never got a chance to visit this  Laxmi Nrusinh Temple. This time, I planned it explicitly to visit this temple during the break of a sports event.

20190825_130521

Shree Laxmi Nrusinh Mandir is located just opposite to Pune Vidyarthi Gruha. It is a two-storied structure with wooden pillars typical to Peshwa Era architecture. From outside one can notice the balcony with a railing supported by balusters and beautifully carved arches.

Though situated on a busy road a single step inside the temple changes the entire atmosphere. Suddenly the hustle and bustle of the busy road fade away and a calm soothing feeling grips your mind.

20190825_125650

This temple is dedicated to Nrusinh or Narsinha which is considered as the fourth incarnation of Lord Vishnu. There are very few temples of Lord Narshinh.

History of the temple: This temple was built in 1774. This idol has been brought from Kashi 250 years ago. A very learned brahmin who was an expert in ‘Vedic Literature’, Ganeshbhat Joshi installed this idol on Ashadh Shudha Dashmi Shake 1696 that is in the year 1774. One can see the exact date written on the exterior pillar of the temple.

20190825_130420

The story goes like this. Mr.Joshi had come to Pune from Sangmeshwar taluka of Ratnagiri district in search of work. Shree Narsinh was his family deity. He had no idol of Narsinh to worship in Pune and this made him very sad. One day he had a vision that Lord Narsinh is in a cactus bush at Kashi. He went to Kashi with his wife. Though the journey was tedious, he really got this beautiful white marble idol there. He installed this idol in Pune and constructed a small beautiful temple. It is said that Peshwa had shown interest in constructing this temple and offering him the right to worship but he insisted that God has come to him so he needs to take care of God.  He constructed a beautiful temple out of which old entrance gate, wooden hall and original sanctum sanctorum can be seen even now. Wooden hall is decorated with intricately carved wooden columns and various frames of different gods are put on the columns. When I visited the temple I  saw a few students studying in this peaceful atmosphere which was a very pleasant sight. The Sanctum sanctorum contains the white marble idol of Narsinh which is shown seated in the lotus position. It is four-handed and supporting goddess Laxmi with one hand sitting in his lap. A carved arch is seen behind the idol with a silver snake covering the idol with its hood.

Currently, the tenth generation is looking after the temple management. Though the temple is private, it is open for devotees.

A short video to give you an inside peek of this temple.

 

 

Lord Narsinh: 4th Incarnation of Vishnu: As per Padma Puran on the 14th day of Shuklapaksha of the Vaishakh month of Hindu calendar, Bhagwan Narsinh appeared. He was having half-human and half-lion form, thus the name Narsinh. As per the Puranas, Bhakta Prahlad was a great devotee of Lord Vishnu. His father, demon Hiranyakashyapu considered himself superior to even Gods and had become unruly and boastful. He had received a blessing that he cannot be killed by a human or bird or animal, he cannot be killed with water or wind or with any weapon, he could not be killed during the day or the night neither at home nor outside. Due to this blessing, he had become boastful and was committing atrocities against his subjects. He did not spare even his own son and started torturing him for worshipping Lord Vishnu. To destroy this demon and stop the suffering Lord Narsinh came to his rescue. He appeared from a column at the twilight in half human and half lion form and killed Hiranyakashyapu on his lap, exactly at the door with his nails. Thus Hiranyakashyapu was not able to get any benefit of his blessing and the Lord saved his ardent devotee Pralhad.

To calm the fierce form of  Narsinh, Sandalwood is applied to these idols, and also water and food donations take place at various temples of Narsinh across India.

20190825_130004

The main place of Lord Narsinh is considered in the Prahladpura temple in Multan of present-day Pakistan. Based on Bhakta Prahlad, the name of the place is called Prahladpura and it is believed that Nrusinh killed Hiranyakashyapu at this place.   Mr.Anant Joshi from the current generation had visited this place a brought some soil and brick from this place as a souvenir of this sacred place.

Interesting facts related to this temple.

Freedom fighter Vasudev Balwant Phadke used to stay here. It is said that in this time he had kept his sword in front of Swami Samarth of Akkalkot to get his blessings. As per the records, Shreedharswami and Balgandharv have also visited this place.

It is feared that this historical temple might be lost due to the road widening project so currently there is a movement going on to stop this.

20190825_125923

Hope this temple which an important part of our heritage stays safe and sound and future generations would be able to see it.

Reference:
पुणे व प्राचीन धार्मिक स्थाने
by D.D.Rege

*The best way to reach this place is to catch a bus and get down at S.P.College. The temple is within a walking distance from this place.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

त्रिशुंड गणपती मंदिर

त्रिशुंड गणपती मंदिर
सोमवार पेठेतील अगदी गजबजलेला, वाहता रस्ता पण तिथून एका गल्लीत वळण घेताच काही बिल्डींग्सच्या मधोमध दडलेलं हे शिल्प लेणं आहे २५० वर्षांपेक्षाही पूर्वीचे.

कमला नेहरू हॉस्पिटल जवळचे हे त्रिशुंड गणपतीचे पेशवेकालीन मंदिर, राजस्थानी, माळवा तसेच दाक्षिणात्य कलेचा प्रभाव असलेले आढळते. साधारण पाच फुटी जोत्यावर हे मंदिर स्थित आहे.

त्रिशुंड मंदिराचे प्रवेशद्वार
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध शिल्प पट कोरलेले आहेत. यातील एकेक शिल्प बघताना आपण अगदी थक्क होतो. घंटेची साखळी हातात धरलेले भारवाही यक्ष तर कुठे विविध पक्षी मोर, पोपट तसेच यक्ष किन्नर हे कोरलेले दिसतात. इथे गजव्याल अशी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहायला मिळते. दाराच्या दोन्हीबाजूला द्वारपाल आहेत.

मंदिराचे प्रवेश द्वार व त्याच्या बाजूची भिंत अनेक शिल्पाने सुशोभित आहे.. दशावतार, यक्ष, कृष्ण तसेच इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहेत.इथे द्वारावर मकर तोरण बघायला मिळते.

ललाटबिंबावरील गणेश त्याच्यावर गजलक्ष्मी आणि वर पिसारा फुलवलेले मोर व शेषशायी विष्णू अशी शिल्पांची लयलूट दिसून येते अंत्यंत रेखीव द्वारपाल यांच्या बरोबरीनेच एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आपले लक्ष वेधून घेते. इंग्रज अधिकारी बंगाल आणि आसामच्या शक्तीच्या प्रतीक असलेल्या गेंड्याला साखळदंडाने जखडत आहे. प्लासी च्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने आसाम व बंगाल या प्रांतांवर मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे हे शिल्प असावे असे जाणकारांचे मत आहे.

इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातातील बंदुका पण या शिल्पात दिसून येतात या शिल्पाच्या खाली एकमेकांशी झुंजणारे हत्ती पण दिसून येतात.

सभामंडप, अंतराळ व गाभारा

सभामंडपाचे छत घुमटाकार असून सभामंडप बऱ्यापैकी मोठा आहे. अंतराळ छोटा असून तिथे छतावर मध्यभागी फुलांची नक्षी कोरलेली आहे.

गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस देवकोष्ठे असून प्रत्येकावर चित्र वेगवेगळी आहेत. एका देवकोष्ठावर पोपट तर एकावर हत्ती अशी शिल्प आहेत.

गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारात साधू वेशातले द्वारपाल दिसून येतात.
गाभाऱ्याच्या शिवाचे शिल्प असून ते पार्वती व शक्ती सहित कोरलेले आहेत.पार्वतीचे वाहन सिँह आणि शिवाचे वाहन नंदी कोरलेले दिसून येतात. या शिल्पाच्या वरती शिलालेख आहेत ते फारसी, संस्कृतमध्ये आहेत. इंदूरच्या धामापूर येथील भीमगीरीजी गोसावी यांनी हे मंदिर बांधल्याची माहिती मिळते. या मंदिराचे बांधकाम १७५४ मध्ये सुरु झाल्याचा उल्लेख मिळतो.


यातल्या संस्कृत शिलालेखात हे मंदिर महांकाल रामेश्वर शिवाचे असल्याचा उल्लेख सापडतो तर फारसी शिलालेखात हे मकान श्रीगुरुदेव दत्त यांचे असल्याचा उल्लेख सापडतो.

त्रिशुंड गणेश मूर्ती :
ज्या मूर्तीमुळे ह्या गणपती मंदिराचे नाव त्रिशुंड गणपती मंदिर असे आहे ती तीन सोंडा असलेली मूर्ती अत्यंत सुबक व रेखीव आहे.एक मुखी,सहा हात व तीन सोंडा असलेली ही मूर्ती मूळची काळ्या पाषाणातली असून शेंदूर चर्चित आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशा पद्धत हे मंदिर आहे. एक मुखी, सहा हात व तीन सोंडा असलेली ही मूर्ती मूळची काळ्या पाषाणातली असून आता शेंदूर चर्चित आहे.


मयूरावर चौरंग आणि त्यावर अत्यंत कोरीव अशी ही गणेश मूर्ती गणेशमूर्ती प्रथापित आहे. गणपती शेंदूर चर्चित गणेश मूर्तीच्या डाव्या मांडीवर असलेल्या शक्तीच्या हनुवटीला एका सोंडेने स्पर्श करत आहे तर एका सोंडेने मोदकाला स्पर्श तर मधली सोंड मयुराच्या डोक्यावर ठेवली आहे. मोराच्या तोंडात नाग आहे अशी ही अतिशय वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती आहे.


मूर्तीच्या मागे शेषशायी नारायणाचे अतिशय सुंदर शिल्प कोरले आहे व त्यावर गणेश यंत्र प्रस्थापित केले आहे.

तळघरातील समाधी
तळघरात दलापत गोसावी यांची समाधी आहे. गणेश मूर्ती च्या बरोबर खाली ही समाधी आहे आणि अभिषेकाचे पाणी बरोबर त्या समाधी वर पडते. सभामंडपातून तसेच गाभाऱ्यातून खाली तळघरात जाता येते. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांना तळघरात जाऊन समाधीचे दर्शन घ्यायची परवानगी आहे. इतरवेळी या तळघरात पाणी असते व ते व्यवस्थापनाद्वारे गुरुपौर्णिमेला उपसून काढून भाविकांसाठी दर्शनासाठी सोय केली जाते.


लिंगोद्भव शिव :
त्रिशुंड गणपतीच्या प्रदक्षिणा मार्गात मागच्या भिंतीला एक अनोखे शिल्प कोरलेले आहे. हे लिंगोद्भव शिव आहे. फक्त शाळुंका रूपातील या मूर्तीस नागाने छत्र धरलेले असून वर जाणारा हंस व खालच्या दिशेने मुसंडी मारणारा वराह कोरलेला आहे. या मूर्तीसंदर्भात एक कथा सांगण्यात येते. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद सुरु झाला तेव्हा शिव अग्नी स्तंभाच्या रूपाने प्रकट झाले व त्यांना या स्तंभाचा आदी व अंत शोधण्यास सांगितले . विष्णूने वराहरूपात त्या स्तंभाचा आदी शोधायचा प्रयत्न केला व पाताळात मुसंडी मारली तर ब्रह्माने हंस रूपात त्या स्तंभाचा अंत शोधण्यासाठी आकाशात झेप घेतली. पण दोघेही या कामात अयशस्वी ठरले व शेवटी शंकराला शरण गेले.

हे मंदिर पेशवे कालीन असूनही कुठेही लाकडी कलाकुसर आढळत नाही तर काळ्या पाषाणावर केलेले नाजूक नक्षीकाम दिसून येते.

पुणेकरांनी तसेच बाहेरगावाहून पुण्यातील वारसास्थळे बघण्यासाठी आलेल्या लोकांनी आवर्जून पाहावे असे हे मंदिर आहे.

ठाण्याचे श्री. यशवंत अनंत मोरे यांनी खूप परिश्रम घेऊन ह्या मंदिराची जागा स्वच्छ केली व पूजा अर्चा सुरु केली, भीमगीरीजीनचे वंशज कैलासगिरजी १९५२ मध्ये पुण्यात आले आणि त्या नंतर इथे उत्सव सुरु झाले व हळूहळू हे मंदिर भाविकांच्या नजरेत भरू लागले. हे दोन्ही उल्लेख डी.डी.रेगे यांच्या पुणे व प्राचीन धार्मिक स्थाने या पुस्तकात येतात. ह्या मंदिराला सकाळच्या व संध्याकाळच्या वेळात भेट देता येते.

बेडसे लेणी: एक अनमोल ठेवा 

1578668452368.JPEG

आजिवली देवराईची सफर संपवून आमची बस बेडसे लेण्यांकडे निघाली. काहीजण डुलक्या घेत होते तर काही जण चालत्या बसमधूनही दोन्ही बाजूने उभ्या ठाकलेल्या तुंग आणि तिकोना यांचे रूप कॅमेऱ्यात बंदिस्त करत होते. पवना नगरचा विस्तीर्ण जलाशय आणि त्याच्या बॅकड्रॉपला तुंग असा सुरेख फोटो आम्हाला टिपता आला. वाटेत एका चिंचोळ्या रस्त्यावर आमची बस अडली. बरोबर समोर एक टेम्पो येऊन उभा ठाकला होता. समोर आमची अवाढव्य बस बघूनही तो गाडी मागे न घेता शांतपणे थांबला होता. अरुंद रस्त्यामुळे दुतर्फा वाहतूक शक्यच नव्हती. आमच्या ड्रायव्हर चाचांनी जवळ जवळ पाचशे (५००) मीटर बस मागे नेली तेव्हा कुठे तो टेम्पो जागचा हलला आणि बाजूने गेला. बस सारखं अवजड वाहन चालवणं तसं जिकिरीचं काम. अरुंद, खाचखळग्यांनी भरलेले रस्ते, जुनी बस तसेच इतक्या लोकांची जबाबदारी चाचांवर. पण खरंच प्रत्येक ट्रिप यशस्वी होण्यामागे जेवढा हात टीम लीडर आणि इतर सदस्यांचा असतो तितकाच सुरक्षितरित्या आणि जबाबदारीने बस चालवणाऱ्या ड्रायव्हर काकांचा असतो.

 

938e4468-c785-4fc2-8ced-f02f3ee38d9e.jpg

Driver chacha photo Captured by Dr.Fene

 

साधारण पाऊण तासाने आमची बस बेडसे लेण्यांच्या पायथ्याशी पोचली. बेडसे गावामुळे या लेण्यांना ‘बेडसे लेणी’ असे नाव पडले आहे. पुण्याहून लोणावळ्याला जाताना कामशेत गावाच्या थोडं अलीकडे बेडसे गाव आहे आणि गावाच्या पाठीमागे असणाऱ्या डोंगरावर ही लेणी आहेत. पवना नदीच्या खोऱ्यात भातराशी डोंगराच्या अगदी शेजारी,’सुमती’ नावाच्या डोंगरावर हे सौंदर्यशिल्प आहे. कार्ले भाजे लेण्यांपेक्षा काहीशी दुर्लक्षित त्यामुळे इथे वर्दळही कमी असते. पायथ्याशी गाडी लावायला सहज जागा मिळून जाते. लेण्यांच्या पायथ्याशी कृष्णाई नावाचे हॉटेल आहे, तिथे चहा नाश्त्याची सोय होऊ शकते.

08AC7A5A-C6C9-4EB7-9EE1-7429BB51D67A.jpg

 

खालून डोंगराकडे दृष्टिक्षेप टाकला कि लेण्यांच्या खाचा /गुहा दिसून येतात. वर चढायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलं की साधारण दोनशे, अडीचशे पायऱ्या असतील पण प्रत्यक्षात ४००(चारशे)पायऱ्या होत्या.

IMG_5161

पण पायऱ्या चढायला अतिशय सोप्या आहेत. आमच्या गटातली सर्व जेष्ठ व कनिष्ठ मंडळी वर पटापट चढून आली.बाकी मंडळी वर चढायच्या आत आमच्या फिरस्तीच्या ग्रुप मधील ‘फास्टरफेणे’ अर्थात डॉक्टर दीपक फेणे यांचा मंदार पेशवेनी एक अप्रतिम फोटोही टिपला.

761cc86c-f656-4a97-8811-00d8b3f5e407.jpg

बेडसे लेणी चढण्यासाठी पुरातत्वखात्याने इथे नवीन पायऱ्या बांधल्या आहेत तसेच पावसाचे पाणी वाहून जावे, साठून राहू नये या साठी काही उंबरे पण केले आहेत. तरी मधून मधून काही जुन्या पायऱ्याही दिसून येतात.

चढताना दोन्ही बाजूला विस्तृत कठडे असल्यामुळे वाटेत दमल्यावर तिथे बसायचा विचार मनात आला तर झटकून टाकावा कारण बरेचदा त्या कठड्यांच्या जवळ साप ऊन खात बसलेले असतात. आम्ही पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती त्यामुळे सापांचे दर्शन काही झाले नाही पण वरती लेण्यांजवळ कात मात्र सापडली.

1578668452430.JPEG

 

बौद्ध भिक्षु धर्मप्रसारासाठी जेव्हा निरनिराळ्या ठिकाणी जायचे तेव्हा पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करायला लागायचा. ह्या लोकांची कायमस्वरूपी काही व्यवस्था करण्यात यावी यासाठी लेण्यांच्या निर्मिती करण्यात आली. भारतात बाराशे (१२००) लेणी आहेत त्यापैकी सुमारे आठशे लेणी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील सर्व लेण्या व्यापारी मार्गावर आहेत. चांगला पोत असलेला कठीण आणि एकसंध असा पाषाण सह्याद्रीच्या अग्निजन्य खडकांच्या रूपात मिळाला.

1574155602902

 

आम्ही लेण्यांजवळ पोहोचताच सर्वप्रथम भव्य खांब दिसून आले. तिथे आमची वाट बघत A.S.I. (आर्कियॉलॉजिकल  सर्वे ऑफ इंडिया) चे संतोष दहिभाते आम्हाला माहिती देण्यासाठी थांबले होते.

ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात(इ.स.पूर्व पहिल्या शतकाचा उत्तरार्ध),एका एकसंध पाषाणात, जणू काही आधी कळस मग पाया असे वरून खाली फक्त छिन्नी हातोडीने इतके भव्य लेणे खोदण्यात आले. गुहेच्या बाहेर एक छोटा स्तूप होता त्याची माहिती देताना दहिभाते म्हणाले की पूर्वी आधी छोट्या प्रमाणावर शिल्पाची / छोट्या स्तूपाची निर्मिती करून ते काही वर्षांकरिता तसेच सोडण्यात यायचे. त्यावर ऊन,वारा,पाऊस याचा कसा परिणाम होतोय याचा अंदाज घेऊन पुढचे काम केले जायचे. भिक्षु एक दोन वर्षांनी परत त्याच स्थानी आले कि त्याचे निरीक्षण करून पुढचे काम करणे योग्य असेल का नाही ते ठरवत.

1578671114746.JPEG

आमची आपापसात चर्चा चालू होती “अतिशय रेखीव मूर्ती त्याकाळी फक्त छिन्नी हातोड्याने कशा बनवल्या जात असतील? खरंच अद्भुत आहे”.“त्यातून हा बसाल्ट खडक (अग्निजन्य खडक) अतिशय टणक आणि कठीण”.  A.S.I. चे दहिभाते आम्हाला माहिती देताना म्हणाले की त्याकाळात आधी छिन्नी आणि हातोड्याने एक मोठे भोक पाडून त्यात लाकूड ठेवले जायचे व सतत पाण्याचा मारा केला जायचा, त्यामुळे लाकूड फुगायचे व खडकाला तडा जायचा आणि तो खडक तोडणे सोपे व्हायचे.

1574155518433

 

घाटमाथ्यावर कोरलेली ही लेणी. त्यात भिक्षूंचे ध्यानमंदिर म्हणजे ‘चैत्यगृह’ आणि ‘वर्षा विहार’ म्हणजे राहण्याची सोय असे दोन विभाग पडतात. मोठा स्तूप, कलते खांब, चैत्याकार गवाक्षे तसेच वेदिका व लाकडी हर्मिका ही सर्व रचना इथे दिसून येते. आत शिरताच जे चार  खांब दिसतात त्या पैकी दोन खांब पूर्ण स्वरूपाचे तर दोन अर्ध स्तंभ आहेत.एकेक खांबांच निरीक्षण केल की खाली चौथरा, त्यावर कलश, त्यावर अष्टकोनी खांब आणि त्यावर उमललेलं सुरेख कमळ, त्यावर अश्वारूढ, गजारूढ स्त्री आणि पुरुष दिसून येतात. नीलगाय आणि बैलावर आरूढ स्त्री-पुरुष असे शिल्पही दिसले. हे स्त्री-पुरुष हातातील कंकण, माळा, कर्णफुले, अशा विविध आभूषणांनी नटलेले आहेत.

मुख्य चैत्यगृहाच्या बाहेरील भिंतीवर पिंपळपान तसेच त्याखाली चैत्यकमानी कोरलेल्या दिसतात. मुख्य चैत्यगृह सव्वीस खांबांवर उभे केले आहे. आतमध्ये मोठा स्तूप आहे. चैत्यगृहाजवळील खोलीच्या द्वारपट्टीवर एक शिलालेख मिळतो. नाशिकच्या आनंद नावाच्या व्यापाऱ्याच्या मुलाने ही खोली बांधली असल्याचा उल्लेख त्यावर आहे. एका शिलालेखात या भागाचे नाव ‘मारकुड’ असल्याचा उल्लेख देखील सापडतो. ज्या धनिकांनी, व्यापाऱ्यांनी अथवा राजांनी ही लेणी खोदण्यासाठी अनुदान दिले त्यांची नावे इथे ब्राह्मी लिपीमधील शिलालेखात आढळून येतात. पण ज्यांनी इतकी अद्भुत शिल्प खोदली मग ती कार्ले भाजे लेणी असूदेत किंवा अगदी वेरूळची लेणी; या शिल्पकारांची नावे मात्र कुठेही दिसून येत नाही. इतक्या सुबक आणि रेखीव मुर्त्या, शिल्पकाम पाहून मनोमन खात्री पटते :हे अनाम शिल्पकार, वास्तुरचनाकार खरे प्रतिभावंत.

1578668452041.JPEG

चैत्यगृहाच्या शेजारीच गजपृष्ठाकार एकसंध असे विहार आहेत. ते पण आवर्जून बघण्यासारखे.

या अतुलनीय शिल्पकृतींचे माहात्म्य गावे तितके थोडेच आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यांचे सौंदर्य अजून खुलून दिसते ते सकाळच्या वेळी. सुवर्ण किरणांनी न्हाऊन निघालेले चैत्यगृह आणि खांब पाहणं म्हणजे अद्भुत अनुभव आहे. संतोष दहिभातेनी आम्हाला पहाटेच्या सुवर्ण झळाळीचे काही फोटो दाखवले आणि असा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आम्ही परत येऊ तेव्हा पहाटे लवकर येऊ असा निश्चय ग्रुप मधल्या अनेकांनी केला.

लेणी नीट बघताना त्यांच्या सौंदर्याबरोबर काही क्लेशकारक गोष्टी सुद्धा जाणवतात. मुख्य चैत्यगृहाची शोभा वाढवणाऱ्या लाकडी फासळ्या आता गायब आहेत. हत्तीचे सुबक शिल्प आहे पण त्याच्या सुळ्यांच्या जागी  नुसत्याच खोबणी आहेत. पूर्वी तिथे हस्तिदंत किंवा लाकडी सुळे असावेत असा कयास आहे.
ही हीनयान पंथीयांची गुहा असून ते मूर्तिपूजक नाहीत त्यामुळे बुद्धाची मूर्ती आढळून येत नाही. पूर्वी इथे खांबांवर बुद्धाची आणि त्यांच्या शिष्यांची काही रंगीत चित्रे होती. हि चित्रे १८६१ (अठराशे एकसष्ट) पर्यंत अस्तित्वात असल्याची नोंद बॉम्बे गॅझेटियरमध्ये सापडते. त्यानंतर कोणी बडा इंग्रजी अधिकारी येणार म्हणून स्थानिक इंग्रज अधिकाऱ्याने ही सर्व चित्रे खरवडून काढली आणि त्यावर सफेदीचा हात दिला आणि अजून एका अनमोल ठेव्याला आपण मुकलो.

1578671114677.JPEG

 

आम्ही लेण्यांवरून खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा बाहेर अंधार दाटला होता तर मनात असंख्य विचार. हे सर्व वैभव बघताना कुठेतरी वेदना सुद्धा होतात की खरोखरच अशा वैभवाला आपण पात्र आहोत का? आपण खरंच हा अलौकिक ठेवा जपण्याचे योग्य ते प्रयत्न करत आहोत का?
भारतीय संस्कृतीचं महत्व स्वदेशी तसेच परदेशी नागरिकांपर्यंत परिणामकारकरित्या पोचवण्यासाठी नुसतेच पुरातत्व खाते नाही तर सजग पर्यटक देखील गरजेचा आहे.

ता. क. हा लेख दिनांक 4 जानेवारी २०२० च्या प्रभात या दैनिकात वर्धापन दिन विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.

Ref: Gazetteer of Bombay Presidency Volume XVIII Part III

 

 

आजिवली देवराईची अनोखी सफर

1578334478972.JPEG

देवराई म्हणजे देवाच्या नावे राखून ठेवलेले वन. तिथली फुले तोडायची नाहीत,फळे घ्यायची नाहीत, पाने तोडायची नाहीत. इथे कोणताच मानवी हस्तक्षेप मान्य नाही हा अलिखित नियम. पुणे जिल्ह्यामध्ये ३०० च्या आसपास देवराई आढळून येतात.

(ref:https://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/a-novel-initiative-to-conserve-devrais-in-western-ghats/article24194228.ece)

मला नुकतीच फिरस्तीच्या अभ्यासकांबरोबर आजिवली देवराईला भेट देण्याची संधी मिळाली आणि ही संधी मी नक्कीच दवडणार नव्हते.

आमच्या प्रवासाची सुरुवातच अनोख्या पद्धतीने झाली. बसमध्ये चढतानाच, शिवाजी पुतळ्याला एक सुरेख, पुष्ट अळी दिसली. करड्या आणि केशरी  रंगाची, अंगावर पांढरे ठिपके असलेली  ही ४ इंची अळी मोठ्या दिमाखात कर्वे रस्त्यावर फिरत होती.

1578336254718.JPEG

“अरे हे तर ओलिएण्डर हॉक मॉथ आहे, मोठ्या झाडांवर बरेचदा आढळते”, इति मयुरेश कुलकर्णी. प्रवासाच्या सुरुवातीलाच इतका छान शुभ संकेत मिळाला होता त्यामुळे ट्रिप मस्त होणार आहे ह्याची खात्री पटली.

आमच्या बरोबर मयुरेश कुलकर्णी, हे जैवविविधतेचे तज्ञ आणि अनुराग वैद्य होतेच त्यामुळे आमचे शंकानिरसन तिथल्या तिथे होत होते.

बसमध्ये सुप्रसादने पुण्यातील डॉक्टर हेमा साने यांनी त्यांच्या घरी जपलेल्या देवराई बद्दल माहिती पुरवली तर स्वप्नीलनी त्याच्या नेहमीच्या मिश्किल शैलीत महाराष्ट्रातील काही देवरायांबद्दल माहिती दिली.

तसेच मीनाक्षी वर्मा ह्या वनस्पती शास्त्रातील तज्ज्ञ तर भूगर्भ शास्त्रातील तज्ज्ञ सतीश कट्टी यांच्यामुळे निसर्गातल्या प्रत्येक घटकांचं डोळसपणे अवलोकन करता येत होतं.

eb4ca8e6-ec4f-4da0-93e9-46f465b884fd.jpg

रविवारची पहाट असल्यामुळे पुणे परिसर अद्याप सुस्तावलेला होता आणि धुक्याची दुलई अजून बाजूला सरली नव्हती. धुक्यातून वाट काढत हळूहळू आमची बस पुढे निघाली. जसजसा दिवस उजाडू लागला तसा दुतर्फा  पिवळ्या रानफुलांनी बहरलेला परिसर दिसू लागला. आजिवलीच्या दिशेने जाताना तुंग, तिकोना असे दोन संरक्षक किल्ले साथ देत होते तर पवनानगरचा परिसर डोळ्यांना सुखावत होता.

 

पुण्याहून साधारण ६० किलोमीटर वर असलेली ही देवराई सातशे छप्पन (७५६) हेक्टर मध्ये पसरली आहे. विस्तार बराच असला तरी त्या मानाने ही देवराई दाट नाही.सूर्यप्रकाश आत येऊ शकतो. पण अनेक अशा देवराया आहेत जिथे दिवसा गडद अंधार असतो.

अंदाजे दीड तासाच्या प्रवासानंतर ‘अंजनवेल’ म्हणून एका ऍग्रो रिसॉर्ट मध्ये (मावळ, शिळीम) आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. स्वच्छ, मोकळी हवा त्यामुळे भूकही कडकडून लागली होती. तिथे विविध रंगातली जास्वंदीची फुले पाहायला मिळाली. आपल्याकडे दिसतो त्याच्या दुप्पट आकार आणि गडद रंग दिसले. पोहे आणि चहा कॉफीचा दमदमीत नाश्ता झाल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला सिद्ध झालो.

IMG_5101.JPG

 

बस मध्ये विक्रम हा ‘आदिवासी विकास प्रबोधिनी’ या संस्थेचा तरुण आम्हाला  माहिती  देण्यासाठी  आला. त्यांच्या  संस्थेतर्फे गावाच्या विकासासाठी अनेक  कामे  केली  जातात. शिळीम गावाला त्यांनी बंधारा बांधून दिला आहे तसेच गावात मोफत दवाखाना चालू केला आहे आणि खास कौतुकाची गोष्ट म्हणजे एका आदिवासी पाड्याच्या सर्वच्या सर्व (चाळीस) घरांना सोलर पॅनल  दिले आहेत. पु. ना. गाडगीळ यांच्या  C.S.R. प्रोग्रॅमच्या माध्यमातून या संस्थेला आर्थिक मदत दिली जाते तसेच इथला शिळीम इंद्रायणी तांदूळ असा ब्रँड बाजारात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. ही संस्था दिव्यांग मुलांकडून कलाकुसरीच्या विविध वस्तू बनवून घेते.

IMG_5112.JPG

देवराईच्या सुरुवातीला छोटं आजिवली गाव आहे. तिथे पोहोचलो तेव्हा जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथे काही मुले खेळत होती. त्या मुलांचे विना खेळण्यांचे अनेक खेळ चालू होते. कोणी शाळेच्या पत्र्यावर चढून खाली धपाधप उड्या मारत होते तर कोणी आडव्या खांबांना लटकून झोके घेत होते. एका धिटुकलीने तर एका खेकड्याला दोरा बांधला होता आणि त्याच्याशी खेळात होती. आमच्या शहरी मुलांसाठी हा थोडा अचंब्याचाच विषय होता.

IMG_5122.JPG

 

गावातून चालत चालत आम्ही देवराईची वाट पकडली. भाताची शेतं पार करून आम्ही सह्याद्रीच्या कुशीत शिरायचा प्रयत्न करू लागलो. मनुष्याचा कमी हस्तक्षेप (खरे तर नाहीच) या मुळे इथे दुर्मिळ वनस्पती, झाडे, झुडपे, फळे  आढळून येतात. महाराष्ट्रात आजमितीला चार हजार देवराई नोंदवल्या गेल्या आहेत. देवराई एका झाडाची, किंवा अनेक हेक्टर जागेत पसरलेली असू शकते.

पुणे वन विभागाच्या अंतर्गत आता ही आजिवली देवराई आहे. या देवराई मध्ये जमिनीवर उगवणाऱ्या ऑर्किडच्या  सत्तावीस (२७) जाती सापडतात. या वर्षी झालेल्या तुफान पावसामुळे या फुलांच्या दर्शनाला आम्ही मुकलो पण पुढे अख्खा पिक्चर बाकी होता.

 

“अरे, हे झाड कुठले?” “अहाहा! काय सुंदर रंग आहे फुलपाखरांचा! या फुलपाखरांचे नाव काय?” “हा आवाज कोणत्या पक्ष्याचा?” अशा चौफेर भडिमाराला मयुरेश कुलकर्णी न कंटाळता उत्तर देत होते. नुसतेच सायंटिफिक नाव नाही तर त्या वनस्पतींचे देशी नाव, उपयोग, अजून कुठे सापडते, आणि त्यासंदर्भात आलेले मजेशीर अनुभव पण सांगितले. खाजखुजली, सीतेची आसवं, रानतंबाखू, दात पाडी, कोंबडा, कानफुटी अशी गमंतीशीर नावे असलेली झुडुपे दिसली. कारवीची झाडेपण मुबलक प्रमाणात दिसली.

 

20200106_235105.jpg

विविधरंगी फुलपाखरांच्या जोडीने केशरी, काळ्या रंगाचे, हिरवे, निळे चतुर (dragonflies) दिसले.

IMG_5115.JPG

चालताना अचानक शेकरूचा कॉल ऐकू आला.  त्या दिशेनी आम्ही डोळे आणि कॅमेरे सरसावून थोडा वेळ वाट पाहिली पण शेकरूचे दर्शन काही झाले नाही.

आता ऊन वाढायला लागलं होतं. पण एकदा का निसर्गाच्या नितळ रुपाची भुरळ पडली कि उन्हामुळे आपला  चेहरा रापतोय कि काळवंडतोय याचं काही भान राहत नाही. वाटेत खळाळणारे छोटे झरे डोळ्यांना थंडावा देत होतेच. गावापासून साधारण चार पाच किलोमीटर अंतर पार करून आम्ही देवराईच्या तोंडाशी येऊन पोचलो

1578327420570.JPEG

आपल्या पूर्वजांनी निसर्ग सरंक्षणासाठी देवराई ही एक उत्तम संकल्पना राबवली. देवाचा कोप होईल या भीतीने जंगलाचा काही भाग तरी संरक्षित राहिला. प्रत्येक देवराई ही कुठल्यातरी देवाच्या नावाने सोडलेली जागा असते. देवराईतील देवांची नावे मुळाबाई (मुळामुठा नदी फुटते तिथे), टेमलाई, सोमजाई, म्हातोबा अशी असतात. साधारणतः तांदळा रूपातल्या या देवतांचे मंदिर नसते तसेच या उग्रस्वरूपाच्या देवी देवता असतात.
इथे मात्र अपवाद दिसला. गावकऱ्यांनी तांदळा रूपातील वाघजाईचे देऊळ बांधले आहे. पायऱ्यांच्या सुरुवातीला शरभाचे चित्र आढळले.

1578327420815.JPEG

(नरसिंह जेव्हा उतला मातला तेव्हा भगवान शंकरांनी शरभाचा अवतार घेऊन त्याला मारले ही कथा पुराणात सापडते.) टीम लीडर अनुरागने माहिती पुरवली ” ही अशी चित्रे साधारतः किल्ल्यावर आढळून येतात. या शरभाच्या चित्रावरून या देवीला ‘वाघजाई’ नाव पडले असण्याची शक्यता आहे”

1578327420251

 

छोट्या टेकाडावरील या देवीचे दर्शन घेऊन आम्ही खाली आलो. सगळेजण कॅमेऱ्यामध्ये सर्वोत्तम फ्रेम पकडायचा  प्रयत्न करत होते. पर्याय जास्त असले कि निर्णय घेणं आणखी कठीण होऊन बसतं, नाही का? इथे कॅमेऱ्याचा प्रत्येक अँगल, प्रत्येक फ्रेम सजीव होत होती. साथीला सिकाडा आणि क्रिकेट असा एकत्र किर्रर्र आवाज येत होताच. इथे आढळणाऱ्या एका घुबडानेही पुसटसे दर्शन दिले. सभोवताली बांबू, चाळीस, पन्नास ( ४०,५०) फुटी माडाची झाडे होती. आता खरा माहोल जमला होता. देवराईमध्ये गेल्याचा परिपूर्ण आनंद मिळत होता.

IMG_5142.JPG

 

काही वर्षांपूर्वी एका व्यापाऱ्याला ही देवराई विकत देण्याचे ठरले होते तेव्हा काही सुजाण गावकऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ही देवराई वाचली. आजिवली देवराई मध्ये शिकार, सरपण किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी लाकूड  तोड, गाई गुरांना तिथे चरण्यासाठी नेणे यावर बंदी आहे. पश्चिम महाराष्ट्राला जैवविविधतेचे वरदान आहे. आपला हा खजिना आपणच जपून ठेवायचा आहे.

 

IMG-20200106-WA0013.jpg

 

परतीच्या वाटेत काही मंडळी गाडीच्या दिशेनी झपझप पावले टाकीत चालली होती तर काही अजूनही काही इंटरेस्टिंग दिसतंय का याचा शोध घेत होती.जरी वाट तीच असली तरी परतताना आधी लक्षात न आलेली झाडे दिसली. विविध आकारातले रंगीत बेडूक, दगडांशी एकरूप झालेले  मोठे कोळी, खेकडे, ब्रॅकेट फंगस दिसले.

तेवढ्यात मागून कौस्तुभ शाळीग्राम यांची हाक ऐकू आली.

“अरे हे बघा काय आहे”  “उदमांजराच्या पायाचे ठसे तर नव्हेत?”

स्वतःच्या हातावरील टॅटू बरोबर क्रॉस चेक करत आमच्यातील जाणकार मयुरेश कुलकर्णीनी होकार दिला. प्राणी नाही पण निदान ठसे तरी दिसले यामुळे मंडळी आता खुश झाली होती. निसर्गप्रेमी स्वातीने ते ठसे लगेच फोन कॅमेरा मध्ये टिपून घेतले.

Skype_Picture_2020_01_07T04_49_45_131Z.jpeg

 

जेवणासाठी आम्ही परत अंजनवेलला आलो.  मऊ, लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी, पिठलं, लाल आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, थंडगार ताक, कच्चा कांदा आणि गरमागरम भात असा मस्त बेत होता. सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती त्यामुळे आम्ही तिथल्या बाजेवर ठाण मांडून जेवण सुरु केलं. जेवताना गप्पा थांबल्या होत्या तरी नजरेनं आजूबाजूचा परिसर टिपणं चालूच होतं. वारली पेंटिंग्सनी रंगवलेल्या भिंती, जुने टायर वापरून बसण्यासाठी केलेले मोडे तसेच सुरेख आकाशकंदील लावून हा जेवणाचा हॉल सुशोभित केला होता. ही सर्व कलाकुसर दिव्यांग मुलांनी केली आहे.

 

नुकताच तिथे काही फ्रेंच लोकांचा ग्रुप आला होता. त्यातल्या दोघांना बेडसे लेणी चढताना उन्हाचा त्रास झाला होता. आमचे तसेही अकरा किलोमीटर चालणे झाले होते आणि बेडसे लेणी बघण्यासाठी चारशे(४००) पायऱ्या चढायला लगेच निघायचे होते. आमच्या ग्रुपमध्ये अगदी पाच वर्ष ते पंच्याहत्तर वर्ष असे सर्व वयोगटातले उत्साही सभासद होते त्यामुळे हा पुढचा टप्पा लगेच पार करायला जमेल का अशी एक शंका आली. पण प्रत्यक्षात आमच्या ग्रुपचे सर्वात ज्येष्ठ सभासद फेणे काका सर्वात पहिले बेडसे लेण्यांवर जाऊन पोहोचले आणि त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन बाकी मंडळी पण पटापट वर चढून आली आणि उजेडात ही अद्भुत लेणी नीट बघायला मिळाली. बेडसे लेण्यांचा हा प्रवास नक्की अनुभवा आपल्या पुढच्या लेखात!
ता. क. हा लेख दिनांक ५ जानेवारी २०२० च्या प्रभात या दैनिकात वर्धापन दिन विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.

गडांचा राजा: राजांचा गड : दुर्ग राजगड

1578143866915.JPEG

केल्याने देशाटन मनुजा शहाणपण येते असे म्हटले जाते पण खरे तर जसजसे आपण प्रवास करतो, विविध अनुभव घेतो, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो तसतसे आपल्याला अजूनपर्यंत बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या आणि अजून खूपच शिकायचे आहे ही जाणीव तीव्रतेने होते. कदाचित यामुळे जी नम्रता येते हेच खरे शहाणपण असावे.

1577816908927.JPEG

 

ट्रीपवरून आल्यावर लगेच एक दोन दिवसात ट्रिपचा अनुभव लिहून काढायचा हा माझा शिरस्ता. आमची राजगड मोहीम तर फत्ते झाली होती पण त्याचा इतिवृत्तांत लिहिण्यास माझ्याकडून थोडा वेळ गेला. दिरंगाईच म्हणाना पण तेवढ्यातच आमच्या धवल रामतीर्थकर या  सहकाऱ्याने अतिशय विस्तृत तरीही नेटका असा ब्लॉग आमच्या सहलीविषयी लिहिला. आता मी वेगळे काय लिहिणार असा प्रश्न मला पडला.पण पिंडे पिंडे मतिर्भिन्न: त्यांना कदाचित काही उत्तम गोष्टी समजल्या ज्या माझ्या कधीच लक्षात आल्या नसत्या तसेच मलाही काही वेगळ्या गोष्टी दिसतील, जाणवतील, मांडता येतील. कारण एकूण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो तसेच प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. ह्याच विचाराने एक अनोखी ऊर्जा माझ्या अंगात संचारली आणि तो दिवस एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्यासमोर उलगडू लागला.

राजगडची सहल ठरली तेव्हाच आमच्या ‘फिरस्ती महाराष्ट्राची’ या  ग्रुप च्या लीडर शंतनूने आमहाला कळवले होते कि आपण शक्य तेव्हढ्या लवकर निघू कारण राजगड चढायला तसा कठीण व दमछाक करवणारा आहे. त्यात एका दिवसात शक्य तेव्हढा राजगड आम्हाला करायचा होता. त्यामुळे आम्ही राजगडाची  नेहमीपेक्षा एक तास आधी ट्रिपची सुरुवात केली. काही कारणास्तव आमचा दुसरा लीडर अनुराग,  ट्रेकला येऊ शकत नव्हता. आमच्या सवंगड्याना वाटेवर घेत घेत आम्ही लवकरात गावकर नसरापूर फाटा गाठला. अशा ठिकाणांना पोचायला थोड्याफार अरुंद आडवाटा पार करायला लागतात त्या पार करत करत आम्ही राजगडाच्या पायथ्या जवळच्या एका हॉटेल मध्ये आलो. या वेळेस पोहे आणि सँडविच अशी शिदोरी आम्ही पुण्यातूनच घेऊन निघालो होतो. त्यामुळे तिथे खाण्यात फार वेळ गेला नाही आणि आम्ही लवकरच राजगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. पायथ्याशीच आम्हाला मुंबईचा ग्रुप येऊन मिळाला. नेहमीप्रमाणे आम्ही सर्वांची ओळख करून घेत होतो, विविध वयोगटातले, विविध क्षेत्रातले व्यक्ती आमच्या गटात होते.

या वेळच्याआमच्या ट्रिपचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गतज्ञ आणि प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. सचिन जोशी आमच्या बरोबर होते. आतापर्यंत फक्त युट्युब  किंवा पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आम्हाला मिळत होती.

1577816908401.JPEG

वाटेत गरज पडेल तसे २,३ ठिकाणी थांबत, कधी पाणी पीत तर कधी ग्लुकॉन D च्या गोळ्या चघळत आमची चढण सुरु होती. बराचवेळ चालल्यावर आमची आपापसात चर्चा झाली आता चढण संपतच आली असेल ना? तेवढ्यात एका अनुभवी ट्रेकरने आम्हाला कानपिचकी दिली “अरे अजून अर्धी सुद्धा चढण झाली नाहीये. चला पटापट”.

1577816203161.JPEG

ते ऐकताच परत आम्ही पुढे चालू लागलो. पायऱ्या सुरु झाल्या कि राजगड आलाच असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात पायऱ्या खूप उंच असल्याने त्या चढायला तशा कठीण आहेत. थोडे अंतर चालल्यावर पाली दरवाजा खालून दिसायला लागला आणि मग मात्र सर्वांना हुरूप आला, आणि झटझट पावले टाकत आम्ही दरवाज्याजवळ आम्ही पोचलो. महाराजांच्या अगदी सुरुवातीच्या काळात बांधलेल्या  किल्ल्यांपैकी एक असल्याने बाकीच्या किल्ल्यांवर दिसतात तसे गोमुखी दरवाजे इथे नाहीत. पाली दरवाजा वर येताना सहज दिसून येतो. या दरवाज्यातून थेट समोर तोरणा दिसतो.

तिथून पुढे आम्ही सदरेवर आलो. शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

 

1578144273698.JPEG

या समाधी जवळ एक पुरातन दीपमालाही आहे. समाधीच्या समोर पद्मावती देवीचे मंदिर आहे तिथे सर्व जण दर्शनाला गेलो. राजगडावर मुक्कामासाठी बरेचजण या मंदिराचा वापर करतात.

1577816908218

आम्ही सर्व आज्ञाधारक विद्यार्धी जोशी सरांच्या भोवती कोंडाळे करून बसलो. नेहमीचे ट्रेकर्स काही काही प्रश्न विचारते होते आम्ही मात्र श्रवण भक्ती करत होतो. पद्मावती देवी मंदिरात एक मूळ मूर्ती जी पूर्वी पूजेत असावी ती आहे आणि समोर दर्शनासाठी जरा घडीव अशी काळ्यापाषाणातील मूर्ती तिथे आहे. पेशवेकालीन रचना दाखवणारे लाकडी खांबही तिथे आहेत.

1578144272541.JPEG

 

पद्मावतीदेवीचे दर्शन घेऊन आल्यावर बाहेर जोरदार चर्चा सुरु झाली कोण बाले किल्ल्यावर जाणार आणि कोण संजीवनी माचीवर जाणार. बाले किल्ला चढायला कठीण अगदी नवख्या ट्रेकर्स ने तो करू नये पण ‘अभी नही तो कभी नही’ या तत्वानुसार आम्ही बालेकिल्ल्याची निवड केली.

काही  मोजके लोक वगळता बाले किल्ल्याचे धाडस करायला सगळे तयार झाले. उभी चढण त्यातले तीन अवघड रॉक पॅचेस आणि त्यात आम्ही गिर्यारोहणात अगदीच नवखे (लोहगड, सिंहगड चढणे आणि हा बाले किल्ला सर करणे यात फार अंतर आहे.) अगदी डोळ्यात तेल घालून पूर्ण एकाग्रतेने आम्ही हा बालेकिल्ला चढत होतो. सुरवातीलाच एक अवघड रॉक पॅच होता पण वरून खाली येणाऱ्या एका ट्रेकरने आम्हाला योग्य त्या सूचना देऊन वर चढायला शिकवले आणि वर खेचून घेतले. या पुढे एक अर्धा किलोमीटरची अरुंद पायवाट होती. इथे मधमाश्यांची पोळी आहेत त्यामुळे तिथून चालताना अतिशय शांततेत चालावे लागते. कोणत्याही प्रकारचा आवाज करून चालत नाही. जोशी सरानी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही हात व चेहरा जॅकेटने झाकून शांतपणे हा टप्पा पार केला. वरच्या भागात चढताना रेलिंग बसवले आहेत त्याला धरून आम्ही पुढचे दोन टप्पे पार केले. आमच्या टीम मधले एक्स्पर्ट ट्रेकर्स कौस्तुभ, डॉक्टर  चैतन्य, विधाते सर, आशिष , घांग्रेकर तसेच मुंबई टीमचे अमित, योगेश हे आम्हाला मदत करत होतेच.

बाले किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या महालाचे अवशेष बघायला मिळतात. बाले  किल्ल्यावरून सुवेळा माचीचा अप्रतिम नजारा तसेच भाटघर धरणाचे बॅकवॉटर बघता येते. बालेकिल्ल्याचा बांधकाम १६४२ (सोळाशे बेचाळीस) ते १६६२ (सोळाशे बासष्ट) या दरम्यान झाल्याचे इतिहास तज्ज्ञ सांगतात. याच किल्ल्यातून जिजामातांनी सिंहगडावरील परकीयांच निशाण बघितला आणि त्यांना तीव्र दुःख झाले आणि महाराजांच्या शूर सैनिकांनी आणि सरदार तानाजी मालुसरेंच्या मोठा पराक्रम गाजवून तो किल्ला परत स्वराज्यात सामावून घेतला हा इतिहास आपण वाचला आहेच. “आधी लगीन कोंढाण्याचं” म्हणत जिथे तानाजी मालुसरेंनी राजमाता जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांच्या साक्षीने किल्ला जिंकण्याची शपथ घेतली त्याच जागी आज आपण उभे आहोत या विचारानेच आम्हाला खूप अभिमान वाटला.

1577816910470.JPEG

ब्रह्मर्षी देऊळ, विविध बुरुज तसेच विविध तलाव पाहून आम्ही बाले किल्ला उतरायला सुरुवात केली. बालेकिल्ला मोहीम फत्ते झाल्यावर आपण काहीतरी महान कर्तृत्व गाजवले आहे अशा थाटात मी परत त्या उभ्या चढणीकडे बघितले आणि बघते तर काय एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा झपाट्याने बालेकिल्ला सहज उतरत एक ८० (ऐंशी ) वर्षाच्या आजीबाई झरझर येत होत्या. आमच्या गर्वाचं घर इतक्या लवकर खाली होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्या ससून मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आहेत असं कळलं. त्यांच्या बरोबर “सेल्फी तो बनता है” असं म्हणून आम्ही आळीपाळीने फोटो काढून घेतले.

1577816911018.JPEG

 

खाली येताच सर्वजण सदरेवर जमलो तो पर्यंत दुसरा ग्रुप सुद्धा संजीवनी माची करून परत आला होता. राजगडाच्या दर्शनाने मन अगदी तृप्त झालं होतं त्या नंतर फक्त भुकेची वेळ आहे म्हणून सर्व जण शिदोऱ्या सोडून जेवायला बसलो. मडक्यातलं दही आणि बरोबर आणलेले पराठे यामुळे आता पोटोबाही निवांत झाले होते.

राजगड पूर्ण पाहायचा असेल, पूर्णपणे अनुभवायचा असेल तर खरं म्हणजे ८ दिवस हवेत आणि आम्ही तर एका दिवसात परत जाणार होतो. थंडीत अंधारही लवकर पडतो त्यामुळे जेवणानंतर लगेचच आम्ही परतीच्या वाटेला सुरुवात केली.

खाली उतरताना आमचा वाढलेला आत्मविश्वास आम्हाला जाणवत होता. खाली एका चहाच्या टपरीवर सगळेजण थांबलो. टपरीवर चहा आणि वडा पाव वर सर्वांनी मस्त ताव मारला. आमच्यापैकी कोणाचा पाय मुरगळला होता, कोणाला क्रम्प्स होते पण राजगड चढून, भटकून एक अनोखा उत्साह टीम मध्ये संचारला होता. गाडीत चढायच्या आधी डॉ. चैतन्य व मिलिंद परांजपे यांनी आम्हाला काही स्ट्रेचेस शिकवले त्यामुळे परतीच्या प्रवासाला सगळे सज्ज झाले.

संपूर्ण ट्रेकभर जाणवलेली मौल्यवान गोष्ट म्हणजे टीमवर्क. ग्रुपमधला प्रत्येक मेंबर आपापल्या परीने एकमेकांना मदत करीत होता. मी माझ्या पुरते बघेन तुमचे तुम्ही बघा अशा दृष्टिकोनाला तिथे थाराच नव्हता. आणि हेच आमच्या यशस्वी ट्रेकचे गमक आहे.

IMG-20191124-WA0046.jpg

या ट्रेकने मला काय दिले? तर निखळ आनंदात घालवलेला एक दिवस, शाळेत कधीही न वाचलेल्या, माहिती नसलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टी, पुरेपूर आत्मविश्वास, उत्तम गटकार्य आणि निसर्गाचा अमूल्य सहवास.

पूर्वी एका ज्येष्ठ गिर्यारोहकाने आकाशवाणीवरील त्यांच्या मुलाखतीत एक वाक्य सांगितले होते “सर्वात कठीण गड म्हणजे उंबरगड अर्थात घराचा उंबरा”. तो पार केल्याशिवाय मुक्तपणे निसर्गात भटकंती केल्याशिवाय, चढाईचे कष्ट घेतल्याखेरीज राजगड कसा आहे हे आपल्याला समजणार नाही.  मग येताय ना लवकरच, राजगडाच्या दर्शनाला?

ता. क. हा लेख दिनांक ४ जानेवारी २०२० च्या प्रभात या दैनिकात वर्धापन दिन विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.

A Visit to GMRT: Giant Metrewave Radio Telescope

It was a much-awaited trip indeed. Mr.Darshan Wagh of destination nature was following up for this visit with the officials from the month of June. While doing a followup he came to know about a free slot on Friday 27th December 19, which he immediately booked for us.

1577469910555

GMRT (Giant Metre wave Radio Telescope), is Asia’s biggest meter wave radio wave telescope and world number 2 radio wave telescope (the first one is situated in Finland). It is situated in the Pune district at Narayangaon of Junnar taluka. So when the opportunity came our way, we immediately grabbed it.

Narayangaon is located at 80 Km from Pune and the road condition is very good. We wanted to reach the place at the earliest so we started pretty early and by picking up our teammates at various stops,  finally, we were on our way to GMRT.

As usual, we started with an informal discussion on the way about the visit and tried to understand the basics. Darshan Sir started with the explanation of some basic concepts like the difference between optical telescope and radio telescope. For a few questions, we had some idea whereas for some questions we were absolutely clueless. However a bright 6th grader, Aadi Kulkarni seemed to have answers to all the questions. Many other children participated in the discussion and made it very interesting.

After this brainstorming session, we were quite prepared for the visit and this introduction helped us to understand the working of this giant telescope in some manner.

I guess, our brain and Stomach are connected in a unique way. As more and more information was getting loaded into our brain the stomach started signaling for the much-needed fuel. We were very much pleased to get a halt for a sumptuous breakfast at Purohit Sweets. Delicious Onion Uttappa and Idli recharged us and we were one our way towards the destination.

1577472233890.JPEG

Within half an hour or so we reached Khodad and a peep outside our bus window provided us a good view of the giant parabolic shaped antenna.

We were welcomed by  Mr. Kailas Gaikwad one of the staff members of GMRT. He was with us throughout our visit in GMRT and was very warm in his approach. He provided us some basic yet useful information in a very simple language.  The entire campus looked picturesque.

20191227_234215
Mr.Gaikwad took us to the central tower, Tower C3 where he was joined by  Mr. Temkar and Mr.Thorat from GMRT staff who showed us the replica of the entire telescope spread in a Y shape.

IMG-20191227-WA0038

Then they showed us the various parts of this giant telescope like stainless steel wire mesh, motors, receivers, amplifiers, concrete towers, etc.  and explained the working of each part in a simplified manner. We are very thankful to the entire GMRT team for their precious time and for sharing valuable knowledge with us.

 

20191227_234023.jpg

We had the huge parabolic dish in actual working condition in front of us which made the understanding simpler and we could actually see the movement of the dish as per the movement of the target object. It was a mesmerizing scene to see this huge dish move.

GMRT:

30 fully steerable parabolic dishes(each of 45-meter diametre) spread over 25  km in Y shape make this Giant telescope. It was set up by scientists from India to get an opportunity to study radio waves coming from astronomical objects at low frequency (10 MHz to 1.5 GHz).

Radio Astronomy was pioneered in India in its true sense by Dr. Govind Swaroop around 1963 which was followed by setting up a Radio dish in Kalyan and then in Ooty where the Sun, stars and other celestial bodies were studied. After a successful implementation of this project,  Dr.Swaroop put forth the idea of Giant Metrewave Radio Telescope and got it sanctioned from the government.

20191227_234723.jpg

The entire project is made from all local set up by Indian scientists. This telescope is in use since the year 2000 and even today the radio scientists from all over the world prefer GMRT to study various objects in the space and the radio waves emitted by those objects.

We were thrilled to see this achievement by our own scientists. We ended our visit to GMRT on a proud note by singing our National Anthem ‘Jan Gan Man’

On our way back we observed the radio images captured by these telescopes and the computer interpretation of the same.  When we were getting into the bus for our return journey, we had as a takeaway, a sense of great pride for being an Indian.

20191227_233740.jpg

Thanks, Destination Nature and Mr.Darshan Wagh for providing this great opportunity.

Note:

*As informed by the authorities, keep your body fully covered with clothes and don’t forget to wear a cap or a scarf to cover your head.
*It is advised to keep your mobile switched off or in flight mode as the mobile wireless communication waves may cause interference in their readings.
*GMRT observatory is open to the public on Fridays however one needs a prior registration and permissions to visit the premises in the provided two slots. On the science day and the following day, it is open for the whole day for the public.

Reference: http://www.ncra.tifr.res.in/ncra/main

 

 

 

 

मलिक अंबर महाल, जुन्नर

मलिक अंबर महाल

पुण्याकडे परतताना भेट दिलेला मलिक अंबरचा महाल हा तर ‘चेरी ऑन द केक’ म्हणावा लागेल. सातवाहन काळापासून सुरु झालेली आमची सफर यादव  काळातून प्रवास करत आता निजामशाही पर्यंत येऊन पोचली होती. मलिक अंबर हा निजामशाहचा वजीर. मूळ इथिओपियातून गुलाम म्हणून आलेल्या या मलिक अंबरला चंगेझ खानने विकत घेतले होते. काही वर्षांनी चंगेझ खानच्या बायकोने मलिक अंबरची सुटका केली व तो निजामशाहीमध्ये रुजू झाला. औरंगाबाद शहराच्या रचनेत मलिक अंबरचे महत्वपूर्ण योगदान मानले जाते.

20190929_171705_001

या मलिक अंबर महालात औरंगजेबाने बालपणीची काही वर्षे व्यतीत केली होती. शिवनेरी जवळील हापूसबाग या गावात आजही हा महाल काहीशा दुरावस्थेत दिसून येतो. घराच्या रचनेवरून मलिक अंबरच्या सौंदर्यदृष्टीची आणि रसिकतेची कल्पना येते. गतकाळाच्या वैभवाची साक्ष तो महाल अजूनही देत आहे.

20190929_171739

परतीच्या प्रवासात अनेक विचारांची मनात दाटी झाली होती. पगारातले ठराविक पैसे बाजूला टाकून आपण छान बचत करून परदेशी ट्रिप्स चे प्लॅन आखतो आणि ते यशस्वी सुद्धा करतो पण आपल्या आसपासचा परिसर आपल्याला किती ठाऊक असतो? तिथली वारसास्थळे, तिथल्या इतिहासाच्या खाणाखुणा, आपल्या शहराच्या विकासाचे टप्पे? आपल्या आजूबाजूची नैसर्गिक विविधता पाने, फुले, पक्षी, प्राणी ? याचे उत्तर बऱ्याच जणांच्या बाबतीत नकारात्मक असेल. आपल्या कळत नकळत या अमूल्य वारश्याकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होत असते.

IMG_5072

नवीन वर्षाचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्व जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत आणि मनात नवंनवे संकल्पही आखत आहेत. चला तर मग, या नूतन वर्षी आपल्या आजूबाजूचा परिसर, तिथल्या गतकाळाच्या खाणाखुणा पाहूया, जाणून घेऊया, समजून घेऊया आणि ते जपण्याचा संकल्प करूया.

कुकडेश्वर मंदिर : जुन्नर

नाणेघाटातून आमची गाडी आता कुकडेश्वरच्या दिशेने दौडू लागली होती. आधी जेवण का आधी कुकडेश्वर? या वर चर्चा सुरु झाली पण फारशी नाट्यमयता न येता अगदी सर्वांनीच ‘आधी विठोबा’ अर्थात आधी कुकडेश्वर मंदिर असे एकमुखाने सांगितले.

कुकडेश्वर मंदिर:

कुकडी नदीचा उगम जिथे होतो तिथे कुकडेश्वराचे मंदिर आहे. जुन्नर पासून किल्ले चावंड अर्थात प्रसन्नगडच्या दिशेने जाताना साधारण २० किलोमीटर वर हे मंदिर स्थित आहे. साधारण सातशे  वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाली. शिलाहार वंशीय झंझ राजाने अनेक शिवालये उभारली त्यापैकी हे एक शिवालय आहे. पूर गावातील हे स्थान ‘पूरचा कुकडेश्वर’ म्हणून प्रसिद्ध आहे.. चुन्याचा वापर न करता एकावर एक दगड रचून हे मंदिर तयार केले गेले.

IMG_5045

मंदिराजवळ पोचताच द्वारशाखेवरील  सुरेख गणेश पट्टीने आमचे लक्ष वेधून घेतले. गणेशाच्या दोन्ही बाजूला विविध वाद्ये हातात घेतलेले शिवगण कोरलेले आहेत. मंदिराच्या दारावर दोन्ही बाजूला शैव द्वारपाल असून त्यांच्याच शेजारी खांद्यावर घागर घेतलेली  नदी(गंगा आणि यमुना) देवतेची  मूर्ती आहे. प्रत्येक शिव मंदिराप्रमाणे इथे पण  कीर्तिमुख आहे.

20190929_144338

आत शिरताच सभामंडप(नंदी मंडप), अंतराळ व गर्भगृह अशा भागात विभागलेले मंदिर पाहायला मिळाले. सभामंडपात, एका देवकोष्टात अतिशय सुंदरअसे शिवपार्वतीचे शिल्प आहे. आत दिसणारे विविध खांब, त्यावरील कोरीवकाम हे सुद्धा लक्षवेधक होते.

प्रत्येक खांबावर मंदिराचा भार पेलणारे गंधर्व, यक्ष, किन्नर दिसून आले. आतील काही खांबांवर सुरसुंदरी, गणेश, शिव पार्वती, नर्तिका, वादक यांची सुरेख शिल्प कोरलेली आहेत. मंदिराचा बाहेरचा भाग विविध थरात विभागला गेला असून त्यात हंस पट्टी, तसेच कीर्तिमुख, कलश, फुले, वेगवेगळ्या भूमितीय आकृत्या अशा विविध शिल्पांनी नटलेला होता.

20190929_142354

काही वर्षांपूर्वी या मंदिराचे शिखर ढासळले त्यामुळे  पुरातत्व खात्याने मंदिराच्या उरलेल्या भागाची पुनर्बांधणी केली.

IMG_5046

कुकडेश्वराच्या मंदिरातील प्रत्येक शिल्प आपल्या सांस्कृतिक वैभवाची, समृद्ध इतिहासाची  साक्ष देत आजही उभी आहेत.  त्याचे योग्यरीत्या जतन आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.

उगमाच्या जवळ धेनु गळ (वीरगळ)आहे.

20190929_144721
धेनु अर्थात गायीला वाचवताना या वीराचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा वीरगळ असल्याचे शिल्पातून दिसते.

20190929_142705

मंदिर पाहता पाहता ३,३:३०  वाजायला आले, जेवण अजून करायचे होते. पण जेवण झाले नसले तरी आमची पोटे भरली होती. अनेक नवीन गोष्टी, ठिकाणं पाहिली होती, अनुभवली होती.  त्यामुळे पटकन जेवण उरकून आता पुढे अजून काय काय पाहता येईल याच्यावर चर्चा सुरु झाली. आणि आम्हाला बघायला मिळाला: आडवाटेत लपलेला पण तरीही गतकाळातील वैभवाच्या खुणा जागोजागी दर्शविणारा असा निजामशाहच्या वजिराचा एक अप्रतिम महाल ‘मलिक अंबर पॅलेस’ जाणून घेऊया पुढील भागात

 

नाणेघाट आणि कुकडेश्वर मंदिर अभ्यास सहल :एक संपन्न करणारा अनुभव

ऐतिहासिक महत्व असलेल्या जुन्नरस्थित नाणेघाटला भेट द्यायचे बरेच दिवस मनात होते पण योग मात्र आला मागच्या महिन्यात. ‘फिरस्ती महाराष्ट्राची’  या भटकंती वेड्या व इतिहास प्रेमी तरुणांनी आयोजित केलेली एक दिवसाची सफर खूप आनंद देऊन गेली आणि समृद्ध बनवून गेली.

20190929_115414.jpg

Satvahan Caves

कोथरूडमधून निघालेली  आमची बस, विविध वयोगटातील, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेत घेत पुढे निघाली. टीम लीडर अनुराग वैद्य बरोबर होता. वाटेत पुरोहित स्नॅक्सला पहिला ब्रेक घेतला. तिथे उपमा आणि चहाच्या जोडीनेच ऐतिहासिक विषयांवरच्या चर्चा सुरु झाल्या व रंगू लागल्या. आमची ट्रिप खूपच चांगली आणि यशस्वी होणार याची चाहूल लागली. सर्व वयोगटातली पण मनानी अतिशय तरुण अशी मंडळी साथीला होती. तिथून पुढे जात होतो तोच वाटेत सोनकीच्या फुलांनी बहरलेला शंभुमहादेवाचा डोंगर दिसला.

 

20190929_104411

मी चालत्या बस मधूनच त्याचा फोटो टिपला. निसर्गाने हिरव्या, पिवळ्या, सोनेरी, आणि विविध रंगांची मुक्त उधळण केली होती. मधेच एका ठिकाणी थांबून काही फोटो टिपले. एका निष्पर्ण झाडाचे प्रतिबिंब मोबाईल मध्ये काढले. अहो, वय काहीही असलं तरी आपलं प्रतिबिंब पाहण्याचा मोह सर्वानाच होणार. ते निष्पर्ण झाड आपलं हे रूप देखील निरखत निश्चल उभं होतं.

 

20190929_110229

आम्ही परत बस मध्ये चढलो आणि अनुराग आणि टीमने नाणेघाट, सातवाहनकाल आणि ब्राम्हीलिपी याची माहिती असलेला कागद हातात ठेवला. तो कागद वाचत, माहितीचे आदानप्रदान करत असताना, बोलण्याच्या नादात जिथे वळायचे होते तो रस्ता सोडून पुढे आलो. मग परत मूळ वाटेवर जाऊन नाणेघाटात पोचलो. आमच्या ग्रुपप्रमाणेच काही २, ३ गाड्या व बायकर्स आलेले दिसले. पण विशेष गर्दी नव्हती.

गाडीतून उतरताच विस्तीर्ण पठाराने आमचे स्वागत केले. काटे कोरांटी, सीतेची आसवं,सोनकी, कुर्डू  अशा विविध फुलांनी तर त्यावर भिरभिरणाऱ्या ब्लू मॉरमॉन, कॉमन क्रो या फुलपाखरांनी सर्वांनाच मोहित केलं.

IMG_4941

सह्याद्रीच रांगडं वैभव आणि त्याला अशी नाजूक फुलापानांनी नटलेल्या, बहरलेल्या निसर्गाची साथ या पेक्षा अजून काय वेगळं हवं? या फुलांनी सर्वांनाच भुरळ घातली आणि प्रत्येकातील फोटोग्राफर आपापले मोबाईल, कॅमेरे, लेन्सेस, ट्रायपॉड अशी विविध आयुध घेऊन सज्ज झाला.

 

IMG_4939

 

आता आमचा मोर्चा मुख्य मिशनकडे म्हणजेच नाणेघाटाकडे वळला. नाणेघाटाच्या सुरवातीलाच एक भला मोठा रांजण आढळला. काहींच्या मते पूर्वीच्या काळातील कर वसुलीची ही व्यवस्था असावी. नाणेघाट हा कोकणाला जोडणारा मुख्य दुवा त्यामुळे हा मुख्य व्यापारी मार्ग होता. त्यामुळे कदाचित यात नाणे टाकून व्यापाऱ्यांना पुढे जायची परवानगी मिळत असावी. पण या विषयी काहीच ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

20190929_114730

जुन्नरमधील नाणेघाट हा दोन मोठ्या कातळात नैसर्गिकरीत्याच तयार झालेला खंदक आहे असे इतिहासकारांचे मत आहे. कोंकण आणि देश या दोन्हीच्या मध्ये उभ्या ठाकलेल्या सह्याद्री मधून माणसांची ने आण तसेच व्यापारासाठी गरजेचा असलेला हा नाणेघाट सातवाहनांनी बांधून काढल्याचे मानले जाते.

IMG_4956

जुन्नर(पूर्वीचे जीर्ण नगर) ही सातवाहनांचा पाडाव ज्यांनी केला त्या नाहपानांची राजधानी. पुढे सातवाहनांनी ते परत जिंकले व जुन्नर हे व्यापार दृष्ट्या महत्वाचे सत्ताकेंद्र बनले.साधारण साडे चारशे वर्ष (इ.स.पूर्व २०० ते इ.स.२५०)टिकून असलेला हा राजवंश तितकाच कर्तबगारही होता. सातवाहनांनी (शालिवाहन) आपल्या काळात स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला तसेच संस्कृत आणि प्राकृत वाङ्मय यात प्रगती करून महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात सातवाहन राजवंशाला अनन्य साधारण महत्व आहे.

सातवाहन हा महाराष्ट्रातील सर्वात पुरातन राजवंश ज्याचे लेखी पुरावे आपल्याला मिळतात. सातवाहनांचे राज्य दक्षिण तसेच मध्य भारतात पसरलेले होते व साडे चारशे वर्ष टिकून राहिले होते. या सातवाहनांचे सर्वात प्राचीन लेख जे ब्राम्हीलिपी मध्ये आहेत ते इथे सापडतात.

20190929_121925

नाणेघाट हा खरंतर दगड धोंड्यानी बनलेला, थोडासा उतार असलेला एक बायपास रोड आहे. पूर्वी इथे घोड्यावरून वाहतूक होत होती.नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच गुहांमध्ये पाणी साचल्यामुळे छोटे छोटे बेडूक जागोजागी आढळून येत होते. ते दगडाच्या रंगांशी इतके एकरूप झाले होते कि चुकून आपला पाय त्यांच्यावर पडू नये म्हणून अजून काळजीपूर्वक चालायला लागत होते.आम्ही एका सातवाहन कालीन गुहेपाशी येऊन पोचलो.ब्राम्हीलिपी मधील काही शिलालेख या गुहेत आहेत.  त्यामध्ये त्या काळातील राजांनी केलेल्या यज्ञांची विस्तृत माहिती दिली आहे. किती धान्य दिले, गोधन, तसेच किती हत्ती दक्षिणा म्हणून दिले याची माहिती त्यात आहे. अश्वमेध यज्ञाचे उल्लेखही आढळतात.

याच गुहेत सातवाहन कालीन राज्यकुलाचे पुतळे कोरलेले होते. राणी नागनिका, सम्राट सिरिसातकर्णी, युवराज स्कंदश्री इत्यादींचे पुतळे होते. सातकर्णी सातवाहन हा नागणिकेचा पती तर वेदिश्री, सतीश्री,हकुश्री ही त्यांची मुले.आज त्या जागेवर ब्राह्मी लिपीतील नावे आढळून येतात त्यावरून हा तर्क लावता येतो.

बघण्यायोग्य अशी हि एकच गुहा आहे. बाकी गुहांमध्ये पाणी असल्यामुळे तसेच त्या खूप अरुंद असल्यामुळे तिथे जाणे अवघड आहे.

20190929_122022

गुहा पाहून आम्ही परतत असताना ‘नानाचा अंगठा’ आम्हाला खुणावत होता. एक १० मिनिटाच्या चढणीनंतर आम्ही वर पोचलो आणि सह्याद्रीच्या रौद्र रूपाचं दर्शन घेतलं.

 

चहूबाजूंनी पसरलेले डोंगर आणि मधोमध खोल दरी अशा दर्शनाने आम्ही काही काळ निशब्द झालो. कॅमेऱ्याच्या क्लिक क्लिकाटाला काही काळ विश्रांती देऊन ते विहंगम दृश्य आम्ही डोळ्यात साठवू लागलो.

 

20190929_124402

नानाचा अंगठा,  ही एक छोटीशी टेकडी म्हणजेच पुणे जिल्ह्याचे एक टोक आहे. इथून जीवधन किल्ला, हरिश्चंद्रगड, भैरवगड, गोरखगड इत्यादी दुर्गाचं दर्शन होतं. चढताना विशेष त्रास झाला नाही पण खरी कसरत उतरताना होती. पावसामुळे वाट थोडी घसरडी झाली होती त्यामुळे तिरकी पावले टाकत,  पायाने ग्रीप घेत आम्ही हळूहळू उतरलो.

चला पटकन नाणेघाटाची एक व्हर्चुअल टूर करूया.

 

पावसाळा संपता संपता इथे भेट दिल्यास खूप आल्हाददायक वातावरणाचा अनुभव मिळतो.

20190929_122400

 

आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा होता प्राचीन कुकडेश्वर मंदिर. अप्रतिम कोरीवकाम आणि उत्तम स्थापत्यकला याचे उत्तम उदाहरण असलेल्या कुकडेश्वर मंदिराची माहिती घेऊया पुढील भागात